Posts

Showing posts from June, 2021

आयआयटी दिल्लीने कोविड-19 साठी विकसित केलेला रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट संच केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज जारी केला.

Image
आयआयटी दिल्लीने कोविड-19 साठी विकसित केलेला रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट संच केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी आज जारी केला. आयआयटी दिल्ली संशोधकांनी, संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी केंद्राचे प्राध्यापक डॉ हरपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा संच विकसित केला आहे. आयआयटी दिल्ली संशोधकांचे आणि उत्पादक भागीदारांचे अभिनंदन करत हे तंत्रज्ञान, देशात कोविड चाचण्या उपलब्धतेत क्रांतिकारी बदल घडवेल असा विश्वास संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आयआयटी दिल्ली मध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून हा संच विकसित करण्यात आला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, कोल्हापुरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे केले जात आहे. - ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. पुणे, रायगड, सातारानंतर आज मा.अजित पवारजी यांनी कोल्हापूरमध्ये कोरोनाबाबत आज आढावा बैठक घेतली. मा. उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे नियोजन केले आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोनासह, म्युकरमायकोसिस प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

केंद्र सरकार लस उत्पादकांच्या एकूण उत्पादनापैकी 75 टक्के उत्पादन खरेदी करून राज्यांना विनामूल्य उपलब्ध करणार: पंतप्रधान

Image
महामारीत जीव गमावलेल्या व्यक्तींप्रति  पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या. महामारी म्हणजे गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण संकट असून आधुनिक जगाने ही महामारी पाहिली किंवा अनुभवली नव्हती असे सांगत पंतप्रधान म्हणाले कि देशाने विविध आघाड्यांवर या महामारीविरोधात लढा दिला आहे. मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. लसीकरण धोरणाचा फेरविचार करण्याची आणि 1 मे पूर्वीची  व्यवस्था परत आणण्याची मागणी बऱ्याच राज्यांनी केली होती त्या पार्श्वभूमीवर राज्यांकडील लसीकरणाचा 25 टक्के वाटा आता केंद्र सरकार उचलणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. याची अंमलबजावणी दोन आठवड्यांत केली जाईल. दोन आठवड्यांत केंद्र व राज्ये नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. 21 जूनपासून केंद्र सरकार 18 वर्षांवरील सर्व भारतीय नागरिकांना मोफत लस प्रदान करेल अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. भारत सरकार लस उत्पादकांच्या एकूण उत्पादनापैकी 75 टक्के उत्पादन खरेदी करेल आणि राज्यांना मोफत देईल. कोणतेही राज्य सरकार लसींसाठी काही खर्च करणार नाही. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना मोफत लस मिळाली असून आता यामध्ये 18 वर्षांचा ग...

भारतीय तटरक्षक दलाने गोवा किनाऱ्यावर पुरवली तातडीची वैद्यकीय मदत

Image
 भारतीय तटरक्षक दलाने आज गोवा येथून तातडीने समुद्र-आकाश मार्गे वैद्यकीय स्थलांतर यशस्वीरित्या समन्वयित केले. मेरीटाईम संरक्षण समन्वय केंद्र (मुंबई) येथे दुपारी 4:30 वाजता माहिती मिळाली की MT ELIM या जहाजावरील 50‌ वर्षे वयाच्या दक्षिण कोरियन नागरीकाला आपत्कालीन वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. त्या वेळी गोव्याच्या दक्षिणेस सुमारे 109 एनएम अंतरावर असलेल्या मार्शल आयलँड या ध्वजवाहिनीला गोव्याच्या दिशेने जाण्याचे निर्देश देण्यात आले आणि तटरक्षक दलाचे जिल्हा मुख्यालय गोवा यांनी त्वरित रुग्णाला  सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्वरेने कार्यआराखडा तयार केला.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य साध्य करण्याचा कालावधी कमी करून 2025 पर्यंत जवळ आणला- पंतप्रधान

Image
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. सेंद्रीय शेती आणि कृषी क्षेत्रात बायोइंधनाचा वापर याबाबत पुण्यामधील एका शेतकऱ्याचे अनुभव पंतप्रधानांनी जाणून घेतले. पंतप्रधानांनी भारतातील इथेनॉल ब्लेंडिंग 2020-2025 साठी आराखड्याबाबतच्या तज्ञ समितीच्या अहवालाचे यावेळी प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरात इथेनॉलचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी ई-100 या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाचा पुण्यामध्ये प्रारंभ केला. “चांगल्या पर्यावरणासाठी जैवइंधनांना प्रोत्साहन” ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, नरेंद्र सिंग तोमर, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या पन्नास हजारांवर पोहोचली

Image
 स्टार्ट अप इंडिया हा भारत सरकारचा एक पथदर्शी उपक्रम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी, 2016 रोजी या उपक्रमाचा प्रारंभ केला. स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि भारतामध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता यासाठी एक सक्षम आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार करण्याबाबतचा हा उपक्रम आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) स्टार्टअप उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो. 3 जून 2021 पर्यंत, डीपीआयआयटीकडून स्टार्टअप म्हणून  50,000 स्टार्टअप्सना मान्यता प्राप्त झाली, त्यापैकी 1 एप्रिल 2020 पासून 19,896 स्टार्टअप्सना मान्यता मिळाली.