Posts

Showing posts from May, 2021

कोविड -19 ला रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञान व डेटा व्यवस्थापन विषयावरील अधिकारप्राप्त गटाच्या अध्यक्षांनी कोविन पोर्टलच्या कामगिरीबाबतच्या वावड्यांचे केले खंडन

Image
 यावर्षी 16 जानेवारीपासून भारत सरकार “संपूर्ण सरकार” पध्दती अंतर्गत प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. भारताच्या भौगोलिकदृष्ट्या विविध कानाकोपऱ्यातील शेवटच्या नागरिकाला लस मात्रेची उपलब्धता सुलभ करण्यासाठी, केंद्र सरकारने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत लसीकरणाबाबतचे सूक्ष्म पैलू जाणून घेण्यासाठी कोविन पोर्टल हा मंच तयार केला होता. लोकसंख्येच्या काही घटकांना फायदा होण्यासाठी कोविन मंचाने डिजिटल दुफळी निर्माण करून असंतुष्ट घटकांना सिस्टम हॅक प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल डिव्हाईड तयार केल्याचे आणि या घटकांना सिस्टमला हॅक करण्यास परवानगी दिल्याचे काही खोटे संदेश प्राप्त झाले आहेत. लसीकरण प्रक्रियेच्या जटिलतेबद्दल मूलभूत आकलनाच्या अभावामुळे नागरिकांनी मंचावर स्लॉट न सापडल्याच्या वावड्या उठवल्या की या मंचातच समस्या आहेत. हे संदेश आणि अहवाल चुकीचे आहेत आणि या प्रकरणात पूर्ण माहितीद्वारे समर्थित नाहीत.

तरुण लेखकांना मार्गदर्शनासाठी ‘युवा’ या पंतप्रधानांच्या योजनेचा सरकारकडून प्रारंभ

Image
देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारताचा आणि भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आज तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) प्रशिक्षण देणाऱ्या युवा या पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेचा प्रारंभ केला. युवा अर्थात (यंग, अपकमिंग आणि व्हर्सेटाईल) तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखकांना मार्गदर्शन करणारी ही योजना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीविषयी लिखाण करण्यासाठी तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून आहे. 31 जानेवारी 2021 रोजी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी, तरुण पिढीला स्वातंत्र्य संग्रामातील वीरांविषयी, या लढ्याशी संबंधित घटनांविषयी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांच्या भागांमध्ये घडलेल्या शौर्याच्या कथांविषयी लिहिण्याचे आणि त्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणाऱ्या सुपुत्रांना सर्वोत्तम पद्धतीने अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. यामुळे आपल्या देशाच्या भ...

इयत्ता बारावीची परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी उच्चस्तरीय बैठक

Image
 बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि भागधारक यांच्यासोबत उद्या एक उच्चस्तरीय आभासी बैठकीचे आयोजन केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, केंद्रीय महिला आणि  बालकल्याण स्मृती झुबीन इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

राज्यातील तातडीच्या मदतकार्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केली 1,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत

Image
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तौते चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज गुजरातचा दौरा केला.पंतप्रधानांनी गुजरातमधील उना (गीर - सोमनाथ), जाफराबाद (अमरेली), महुआ (भावनगर) आणि दीव येथे चक्रीवादळग्रस्त भागाची  हवाई पाहणी केली. त्यानंतर, गुजरात आणि दीवमध्ये राबविण्यात येत असलेल्या मदत आणि पुनर्वसन उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कातकरी समुदायाला मिळाली नवी ताकद-1.57 कोटी रुपयांच्या गुळवेल पुरवठ्यातून उत्पन्नाचे नवे साधन

Image
 महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील युवा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली एका उत्साही गटाने, सरकारी संस्थांच्या पाठिंब्याने अद्भूत कार्य केले आहे. तळागाळातल्या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या या संघटनेने 1.57 कोटी रुपये मूल्याच्या गुळवेल या वनौषधीची विक्री केली. या संघटनेला डाबर,वैद्यनाथ आणि हिमालया अशा मोठ्या कंपन्यांकडून गुळवेलची ऑर्डर आली होती. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात, ‘आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था’ ही युवकांची संघटना त्या भागातील आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. गीलोय- ज्याला आयुर्वेदात गुळवेल किंवा गुडूची अशा नावाने ओळखले जाते, या वनौषधीला सध्या मोठी मागणी आहे. विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. त्याशिवाय मधुमेहावर देखील हे प्रभावी औषध मानले जाते. त्याचा अर्क, द्रव, भुकटी किंवा मग त्याचा गर काढून वापरला जातो.

लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ आघाडीवरील कोरोनायोद्ध्यांपासून करण्याच्या रणनीतीचा दुसऱ्या लाटेदरम्यान मोठा फायदा- पंतप्रधान

Image
 कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळातील असाधारण परिस्थितीशी असामान्य धैर्याने लढा देणाऱ्या वैद्यकीय समुदायाचे आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी आभार मानत, 'आज सारा देश त्यांचा ऋणी आहे' अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.  चाचण्या असोत, औषधपुरवठा असो की कमीत कमी वेळात पायाभूत सुविधांची उभारणी असो- सर्वच गोष्टी अतिशय वेगाने केल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्राणवायूची निर्मिती आणि पुरवठा यासंबंधीच्या अनेक आव्हानांवर मात करण्यात आली आहे. मनुष्यबळात वाढ करण्यासाठी देशाने उचललेली पावलेही महत्त्वाची ठरली असून- कोविड उपचारांमध्ये वैद्यकीच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेणे, ग्रामीण भागात आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेणे अशा उपायांमुळे आरोग्यव्यवस्थेला जास्तीचा आधार मिळाला आहे.

भारतात रेमडेसिव्हीरची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने केली जलदगतीने कार्यवाही

Image
  देशभरात एप्रिलच्या, 2021च्या सुरुवातीपासून  कोविड -19 च्या रुग्ण संख्येमध्ये  झपाट्याने वाढ होऊ लागली. तेव्हापासून कोविड -19 च्या  उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांची  उपलब्धता, उत्पादन आणि पुरवठ्यावर औषधनिर्माण विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले. अमेरिकेच्या गिलिड लाईफ सायन्सेस या पेटंटधारक कंपनीने भारताला मंजूर केलेल्या ऐच्छिक परवान्याअंतर्गत 7 भारतीय औषध कंपन्यांमध्ये  (सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब., हेटरो, जुबिलेंट फार्मा, मायलन, सिंजिन आणि झायडस कॅडिला)  रेमडेसिव्हीर हे पेटंट औषध उत्पादित होत आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ,रेमडेसिव्हीरच्या सातही देशांतर्गत परवानाधारक उत्पादकांना त्वरीत उत्पादन वाढविण्यास  सांगण्यात आले. केंद्र सरकार आणि उत्पादक  कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता अभूतपूर्व वाढली असून दरमहा 38 लाख कुप्यांवरून ती दरमहा सुमारे 119 लाख कुप्यांपर्यंत पोहोचली आहे. देशभरात अतिरिक्त  38 उत्पादन केंद्रांना  वेगवान मान्यता मिळाल्यामुळे, देशातील रेमडेसिव्हीरच्या मंज...

पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून 55व्या( सी3) तुकडीच्या 21 महिला कॅडेट्ससह 110 वैद्यकीय कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमध्ये( एएफएमएस) वैद्यकीय अधिकारी म्हणून 15 मे 2021 रोजी

Image
  पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून 55व्या( सी3) तुकडीच्या 21 महिला कॅडेट्ससह 110 वैद्यकीय कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमध्ये( एएफएमएस) वैद्यकीय अधिकारी म्हणून 15 मे 2021 रोजी रुजू करून घेण्यात आले. मात्र, एएफएमसीच्या वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यासाठी होणारे दीक्षांत संचलन पहिल्यांदाच सध्याच्या कोविड-19 विषयक निर्बंधांमुळे रद्द करावे लागले. लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी, पीव्हीएसएम, कमांडट एएफएमसी यांच्या हस्ते एका छोटेखानी परंतु सुनियोजित कार्यक्रमात वैद्यकीय कॅडेट्सना सेवेत रुजू करून घेण्यात आले. 94 कॅडेट्सना लष्कराच्या, 10 कॅडेट्सना भारतीय हवाई दलात आणि 6 कॅडेट्सना भारतीय नौदलात  नियुक्त( कमिशन्ड) करण्यात आले. नव्याने नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना एएफएमसीचे प्रशिक्षक