Posts

Showing posts from July, 2021

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.

Image
 केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. शहा यांनी या वेळी रुस्तमजी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देखील दिले. या प्रसंगी, सीमा सुरक्षा दल या विषयावर ‘बावा’ नावाच्या माहितीपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक एफ रुस्तमजी यांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की सीमा सुरक्षा दल आणि देशाच्या इतर निम-लष्करी दलांमुळेच भारत जगाच्या नकाशावर स्वतःचे गौरवशाली अस्तित्व टिकवून ठेवू शकत आहे. ते म्हणाले की आजदेखील उणे 45 डिग्री तापमान असुदे, लडाखच्या सीमा असुदेत, वाळवंटातील अतिउष्ण वातावरण असुदे, देशाच्या पूर्व भागातील नदी-नाले, जंगल, पर्वत असुदेत, अशा सर्व टोकाच्या वातावरणांमध्ये जे सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत त्या त्यागी, वीर आणि य...

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

Image
 आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती भारताच्या एकूण कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाने 37.60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,33,797 सत्रांमधून 37,60,32,586 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 37,23,367 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. गेल्या 24 भारतात 41,506 दैनंदिन नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा

Image
 केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा आज आढावा घेतला. केंद्रीय  बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव राजन यांनी मंत्र्यांना मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मंत्र्यांनी देखील त्यांच्या कक्षात मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला.

एलएनजी परिवहन क्षेत्रात क्रांती घडवेल - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Image
 र्नैसर्गिक द्रवरूप वायू - एलएनजी हे स्‍वच्‍छ इंधन असून पेट्रोल व डिझेलप्रमाणे ते प्रदूषण करत नाही. स्‍वस्‍त दरात उपलब्‍ध असलेल्‍या एलएनजीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एलएनजी भविष्‍यातले इंधन असून परिवहन क्षेत्रात ते क्रांती घडवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज  केले. बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहातर्फे पहिला खाजगी  एलएनजी फॅसिलिटी प्‍लांट  नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी नजीक  स्‍थापित केला गेला आहे. त्‍याचे उद्घाटन गडकरी यांच्‍या हस्‍ते आज करण्‍यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दिवसेंदिवस त्‍याचे दर वाढत चालल्‍यामुळे या इंधनाला पर्याय म्‍हणून इथेनॉल, इलेक्‍ट्रीक, सीएनजी, एलएनजी गॅसला भारत सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्‍साहन देत आहे. आपल्‍या देशात साखर, तांदूळाचे उत्‍पादन अतिरिक्त  प्रमाणात झाले असून, त्‍याचे व्‍यवस्‍थापन करणे ही देशासमोरचे मोठे आव्‍हान आहे, असे गडकरींनी यावेळी सांगितले.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूशी पंतप्रधान 13 जुलै रोजी साधणार संवाद

Image
 पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.  पंतप्रधानांचा हा संवाद म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी, या क्रीडापटूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी अलीकडेच  टोकियो -2020 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूच्या  सुविधांच्या सज्जतेचा  आढावा घेतला होता. त्यांनी 'मन की बात' मध्ये  काही खेळाडूंच्या  प्रेरणादायी प्रवासाविषयीही चर्चा केली होती, त्याशिवाय देशवासीयांनी पुढे येऊन या खेळाडूंना मनःपूर्वक पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी देशाला केले होते.

देशात शाश्वत शेतीसाठी कृषी उत्पादनांना योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर किफायतशीर कर्जपुरवठा करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री. एम.वेंकैय्या नायडू यांनी केले.

Image
 देशात शाश्वत शेतीसाठी कृषी उत्पादनांना  योग्य भाव देणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर  किफायतशीर कर्जपुरवठा करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री. एम.वेंकैय्या नायडू यांनी केले. येऊ घातलेल्या जागतिक अन्न संकटाविषयी संयुक्त राष्ट्रांच्या  अन्न व कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की, जर आपण आपल्या  शेतकर्‍यांना वेळेवर सहाय्य केले तर भारत केवळ स्वयंपूर्णच राहणार नाही तर येणाऱ्या काही वर्षांत जगाचीही भूक भागवतील.

तसेच, कोरोनाच्या पाश्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत गोकुळ संघाने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. - ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Image
 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या ११ जुलैपासून म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १ रु. प्रतिलिटर दरवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे.  जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांनी गोकुळचा कारभार करण्याची संधी दिल्यांनतर गेल्या ४५-५० दिवसांमध्ये अनेक बैठका घेत सविस्तर चर्चा करून शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानूप्रताप सिंह वर्मा यांनी स्वीकारला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार

Image
 केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांनी आज देशाचे  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच, उद्योग, महसूल, बंदरे, रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आतापर्यंत सार्वजनिक जीवनात 35 वर्षे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.  लोकसभेत पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या भानूप्रताप सिंह वर्मा यांनी देखील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. एमएसएमई मंत्रालयाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यकृताला इजा होण्याशी गूळवेलीचा संबंध जोडणे, हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे- आयुष मंत्रालयाचे प्रतिपादन

Image
 यकृताच्या अभ्यासासाठी असलेल्या जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटोलॉजी या इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सदस्याच्या  अभ्यासासाठी संदर्भ म्हणून  प्रसिद्ध होणार्या पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास लेखावर आधारित बातमीच्या संदर्भात आयुष मंत्रालयाने हा खुलासा केला आहे. टिनोस्पोरा कॉर्डीफोलिया (टीसी), ज्याला सामान्यत: गूळवेल / गिलोय किंवा गुडुची म्हणून ओळखले जाते,त्या वनस्पतीच्या  सेवनामुळे मुंबईतील सहा रुग्णांचे यकृत निकामी झाले असे  अभ्यासलेखात नमूद केले आहे. याचा अभ्यास करणाऱ्या लेखकांना या प्रकरणातील सर्व आवश्यक तपशील  पद्धतशीरपणे मांडण्यात अपयश आले आहे. या व्यतिरिक्त, गूळवेल (गिलोय) किंवा टीसी याचा संबंध  यकृताच्या   इजेशी   जोडणे  दिशाभूल करणारे  आणि आपत्तीजनक आहे कारण गूळवेल किंवा गुडुची ही वनस्पती भारतीय पारंपरिक  औषध प्रणाली असलेल्या आयुर्वेदात बर्‍याच काळापासून वापरली जात आहे. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी टीसी अर्थात गुळवेलीची परीणामकारकताआधीपासून   सिध्द झाली आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुष रुग्णालयाच्या बांधकामावरील कामगारांसाठी ‘टीका उत्सवा’चे उद्घाटन

Image
 केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज धारगळ, पेडणे येथे उभारण्यात येत असलेल्या आयुष रुग्णालयाच्या बांधकामावरील कामगारांसाठी ‘टीका उत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य संचालनालयाने कामगारांना जाग्यावरच कोविड लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री नाईक यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

आज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर या नव्या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व सन्मानीय डॉ डी.- ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Image
आज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर या नव्या  विद्यापीठाचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व सन्मानीय डॉ डी.वाय.पाटील पाटील साहेब  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनी या विद्यापीठाचे उद्घाटन होणे हा एक चांगला योगायोग आमच्या सर्वांसाठी आहे. 

कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी बहुआयामी धोरण ठरवण्याची गरज: उपराष्ट्रपती

Image
 कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी, बहुआयामी धोरण ठरवण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी व्यक्त केले. त्यासाठी निरोगी जीवनशैली अंगीकारण्याबाबत एक आक्रमक जनजागृती मोहीम राबवण्यासोबतच, सामुदायिक पातळीवर वेळोवेळी आरोग्यविषयक तपासणी शिबिरे आयोजित करण्यावर त्यांनी भर दिला. यासाठी एकत्रित मोहीम राबवण्याची गरज असल्याचे सांगत, “कर्करोगाला आळा घालणे आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी एकत्र येऊया,”असे आवाहन त्यांनी केले.   आयएफसीपीसी 2021 च्या जागतिक संमेलनाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करतांना ते बोलत होते. इंडीयन सोसायटी ऑफ कोल्पोस्कोपी अँड सर्वायकल पॅथॉलॉजीने हे जागतिक संमेलन आयोजित केले आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते, “इंडियन जर्नल ऑफ गायनॉकॉलॉजिकल ओंकॉलॉजीच्या विशेषांकाचेही प्रकाशन झाले.